weather update :- नमस्कार मित्रांनो तसे पाहता आता थंडीचे दिवस संपत आलेले आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये असे समजले जाते की मकर संक्रांति झाली म्हणजे सर्दी कमी होते. परंतु आता आलेल्या हवामान खात्याच्या नवीन माहितीनुसार आता पुढील तीन दिवस आणखीन सर्दी थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात काही दिवसापासून तापमानाचा खाली उतरत असून गाठ वाढला आहे. मुंबईत रविवारी तापमानाचा पारा 13.8 डिग्री सेल्सिअस खाली आला होता. थंड वाऱ्यामुळे बोचऱ्या थंडीची जाणीव हळूहळू होऊ लागली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस सुद्धा मुंबईकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार आहे. weather update
महाराष्ट्रात थंडी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तर भारतामध्ये उपट झालेली बर्फवृष्टी . उत्तर आणि वायव्य देशी दरम्यान येणारे वारे यांच्या परिणामामुळे कोकण मध्य महाराष्ट्र मध्ये थंडी वाढली आहे. तर राजस्थान मध्ये शितलहर असल्याने त्याचा परिणाम सुद्धा उत्तर महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर राहणार आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार 19 आणि 20 जानेवारी पर्यंत कोकणातील चार जिल्हे. तसेच उत्तर महाराष्ट्रात आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागांमध्ये थंडीचा प्रभाव अधिक वाढण्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये उर्वरित ठिकाणी सध्याचे थंडीचा प्रभाव अधिक नाही. मध्य भारतात प्रभावित असलेल्या उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती वा चक्रीय वाऱ्यांच्या परिक्षेत्र महाराष्ट्रात दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीला अडथळा निर्माण झाले आहे. याच दरम्यान 17 ते 20 जानेवारी या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा सुद्धा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता अंदाज वर्तवला जात आहे.
workshop recruitment पुण्यामध्ये आय टी आय पास वर २८३ पदांची भरती
right to education द्वारे आता या मुलांची शाळेची फीस सरकार भरणार
Leave a Reply