सर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणे ही कठीण असते .
त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबतच वयाची पाने जोडण्याबाबत तज्ञांनी विचार करावा.
आणि त्या दृष्टीने सूचना करावा असे प्रतिपादन राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमाकडे पहावेअसेही आवाहन केले आहे .
पुस्तकांमध्येच वयाची पाने टाकण्याबाबत बालभारती येथे विषय तज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते .
त्यावेळी बालभारतीचे संचालक प्रश्न कुमार पाटील माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी शिक्षण संचालक महेश पालकर आधी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे हे अंतिम उद्दिष्ट आहे.
शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपयोग उपक्रम राबतांना अनुभवाने त्यात बदल ही करता येतील.
शालेय शिक्षणाचे गुणवत्ता उत्तम राहावी यासाठी आवश्यक उपक्रम राबितांना मुलावर अभ्यासाचा बोजा पडणार नाही याची दक्षता घ्यावी .
शालेय स्तरावर तीन महिन्यांनी परीक्षा घेण्याचा विचार व्हावा .
ती माहीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देऊन त्यांना सहामाही परीक्षेत उत्तीर्ण दृष्टीने तयारी करून घेता येईल .
सहावीपासून राज्यात एकाच वेळी कलचाचणी घेण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना आवडीनुसार व्यवसायिक अभ्यासक्रम शिकविता येईल मुलांना पोषण आहारातून अधिक गोष्टी मिळावी .
या दृष्टीने ही अनुकूल बदल करावे लागतील असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले आहे.